शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

एक कोटीची झाडे गेली कुठे ? ‘अमृत योजना’ : तज्ज्ञांना डावलून कोट्यवधीच्या निधीची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:23 IST

कोल्हापूर : ‘अमृत’ योजनेअंतर्गत २०१५-१६ साली कोल्हापूर महापालिकेने एक कोटी रुपयांची झाडे लावली. पुढच्याच वर्षी यासाठी एक कोटी ६० लाख रुपये मंजूर झाले. याच निधीतून सध्या झाडे लावली जात आहेत.

समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘अमृत’ योजनेअंतर्गत २०१५-१६ साली कोल्हापूर महापालिकेने एक कोटी रुपयांची झाडे लावली. पुढच्याच वर्षी यासाठी एक कोटी ६० लाख रुपये मंजूर झाले. याच निधीतून सध्या झाडे लावली जात आहेत. आता नव्या आर्थिक वर्षात शहरामध्ये पाच ठिकाणी दोन कोटी रुपये खर्चून झाडे लावण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. मात्र हे करताना कोल्हापूर महापालिकेने त्यांच्याच अंतर्गत कार्यरत असलेल्या वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समितीमधील तज्ज्ञांचा सल्लाच घेतला नसल्याचे पुढे आले आहे.

या योजनेतून पहिल्याच वर्षी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र केंद्र शासनाने हा निधी मंजूर करताना तो कसा खर्च करावा याचे काही निकष दिले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पुईखडी, जयंती नाल्याच्या उतारावर, झूम प्रकल्पावर, विविध स्मशानभूमींमध्ये झाडे लावून हा निधी खर्च केला. सध्या या जागांवर किती झाडे आहेत, हे पाहायला गेले तर मात्र वास्तव वेगळेच दिसते.

सध्या टेंबलाई, साळोखेनगर आणि बेलबाग येथे जी कामे सुरू आहेत त्यांसाठी एक कोटी ६२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आता तर नव्या आर्थिक वर्षात आणखी पाच ठिकाणी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून झाडे लावण्यात येणार आहेत. रंकाळा (१ कोटी), सह्याद्रीनगर (२९ लाख), टाकाळा (लाख), ( पान ४ वर)महापालिकेचा खुलासाहे उद्यान नसून वृक्षवन आहे, राज्यस्तरीय तांत्रिक समितीची प्रकल्पाला मान्यता आहे. प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी वृक्षलागवडीवर ५० टक्के, ३० टक्के लहान झाडे व वेलींसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. सिव्हिल वर्क २० टक्क्यांपेक्षा कमी खर्चाचे करावयाचे आहे. झाडांसाठी निकषांनुसार खड्डे काढले असून, त्यानुसार १/३ भाग जुनी माती भरून झाडे लावली आहेत. ९५ टक्के झाडे देशी प्रजातींची आहेत. दोन झाडांमधील अंतर चार ते पाच फूट आहे. ही वृक्षवने हवामान बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी आहेत. टेंबलाई येथे हा बदल झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.खुलाशातील दावेही चुकीचे‘लोकमत’मध्ये मंगळवारी (दि. ३) याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधीक्षकांच्या स्वाक्षरीने खुलासा पाठविला आहे. त्यामध्ये प्रत्येक झाडामध्ये चार ते पाच फुटांचे अंतर असल्याचा आणि अडीच बाय तीन फुटांचा खड्डा काढल्याचा दावा केला आहे. मात्र बेलबाग आणि टेंबलाई परिसरातील साईटला भेट दिल्यानंतर हे दोन्ही दावे निखालस खोटे असल्याचे स्पष्ट होते. 

महापालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समिती कार्यरत आहे. मात्र तीन ठिकाणी ही वने विकसित करताना डॉ. मधुकर बाचूळकर व अन्य सदस्यांचे मार्गदर्शन घेऊन झाडे लावावीत, अशी स्पष्ट सूचना आयुक्तांनी केली असताना थेट झाडे लावल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली आहे.- उदय गायकवाड, कोल्हापूर महा. वृक्ष प्राधिकरण सदस्य